गोठेघर-भंडार्ली म्हाडा रहिवासी संघाची महापौर सुजाता पाटील यांना सदिच्छा भेटगोठेघर-भंडार्ली म्हाडा रहिवासी संघाकडून नवी मुंबई महापौर सुजाता पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार.

आज दि. २८.०२.२०२६ रोजी महापौर कार्यालय नवीन कूकशेत गाव ( सरसोळे डेपो) नेरूळ येथे नवी मुंबई महानगरपालिकाच्या सन्माननीय महापौर सौ. सुजाता सुरज पाटील तसेच मा. नगरसेवक सुरज (दादा) पाटील यांची गोठेघर-भंडार्ली म्हाडा रहिवासी संघच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान वसाहतीतील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आणि त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी GBRS संघ व म्हाडा वसाहतीतर्फे महापौर व नगरसेवक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वसाहतीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली.

गोठेघर-भंडार्ली म्हाडा वसाहतीतील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक मूलभूत प्रश्न या बैठकीत मांडण्यात आले. त्यामध्ये सर्वप्रथम पथदिव्यांचा प्रश्न अधोरेखित करण्यात आला. वसाहतीत अनेक ठिकाणी अपुरे किंवा बंद असलेले स्ट्रीट लाईट्स तात्काळ दुरुस्त करून नवीन पथदिव्यांची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. रात्रीच्या वेळी अंधारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्राची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. नागरिकांना लहान-मोठ्या आजारांसाठी दूरवर जावे लागते, त्यामुळे स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

बस सुविधा लवकर सुरू करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. नागरिकांच्या दळणवळणाच्या सोयीसाठी नियमित बससेवा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले.

स्थानिक विद्यार्थ्यांसाठी शासकीय किंवा महानगरपालिका शाळेची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेने केली. परिसरातील मुलांना शिक्षणासाठी दूरच्या भागात जावे लागते, त्यामुळे स्थानिक स्तरावर शाळा सुरू करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

तसेच नागरिकांसाठी स्वतंत्र व सुसज्ज स्मशानभूमीची मागणी करण्यात आली. वाढत्या लोकसंख्येमुळे अंत्यसंस्कारासाठी योग्य सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले.

परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बीट चौकी सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्थानिक पातळीवर पोलीस उपस्थिती आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले.

सन्माननीय महापौर सुजाता पाटील यांनी निवेदनाची दखल घेत सविस्तर चर्चा केली. नवी मुंबई शहर आणि १४ गाव परिसराचा समतोल विकास करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी आश्वासन दिले. पथदिवे, आरोग्य केंद्र आणि इतर प्राथमिक सुविधांबाबतचे प्रस्ताव पुढील महासभेमध्ये मांडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गोठेघर-भंडार्ली म्हाडा रहिवासी संघातर्फे कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

जि.प.प्रा. केंद्र शाळा साकत येथे बाल आनंद बाजार हा अभिनव उपक्रम संपन्न

https://lokbhavanmarathinews.com/925/bal-anand-bazar-sakat-2026/

Cidco Lottory 2026

https://cidcohomes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!